
तुला टाळले संबोधनातून,
तुला गाळले इतिहासातून,
जाळले मृतदेह,
विचारांचा
गर्भपात केला.
तरीही...
तू उरलास.
तुजे ओझे वाहतोय
वर्षानुवर्षे.
निर्बुदधाप्रमाणे.
"धर्म तोड़ता नही जोड़ता है!"
खर आहे.
स्वार्था साटी धर्म जोड़ता येतो,
जाती वाटता येतात
माणसे मारता येतात,
हे सारे, तुझ्याच देशाने शिकवले.
"अहिंसा परमो धर्म:"
म्हणणाऱ्या महात्म्या...!
ऐकतोयस् ना तू हे उदध्वस्त स्वर!
-किशोर